पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Pune Politics) अपघाती निधनानंतर अवघ्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात वेगवान निर्णय घेण्यात आले. त्यांच्या (Ajit Pawar Death) निधनानंतर चौथ्या दिवशी पत्नी सुनेत्रा पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत (Sunetra Pawar) जबाबदारी स्वीकारली. शोकाकुल वातावरण असतानाच (Sharad Pawar) हा शपथविधी पार पडल्याने तो घाईघाईत झाला, अशी टीका झाली, तर दुसरीकडे जबाबदारीपासून पळ न काढता पुढे येणाऱ्या भूमिकेचे समर्थनही करण्यात आले. (Maharashtra Politics)
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल माने यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, पवार कुटुंबाने तिसऱ्याच दिवशी दशक्रिया विधी पूर्ण केल्याने चौथ्या दिवशी शपथविधी झाला. राज्यातील प्रशासकीय कामकाज आणि सत्तेतील पोकळी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे अजित पवारांकडे असलेली जवळपास सर्वच खाती सोपवण्यात आली असून, केवळ अर्थ खाते त्यांच्याकडे देण्यात आलेले नाही. यासोबतच पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. 9 फेब्रुवारीपासून त्या मंत्रालयीन कार्यालयात नियमितपणे उपस्थित राहणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीसह बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता. बारामतीकरांनी आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली, तर बीडमध्येही पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी निर्माण केलेल्या विश्वासामुळे जनतेने आपुलकीने प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे बीडमध्ये यापूर्वी संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडे पालकमंत्रीपद देण्यात आले होते.
आता हीच जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आल्याने, बारामतीप्रमाणेच बीड जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय समन्वय कसा साधला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे वैयक्तिक दुःख, तर दुसरीकडे राज्याची मोठी जबाबदारी अशा परिस्थितीत त्यांनी स्वीकारलेली भूमिका पुढील काळात त्यांच्या नेतृत्वाची दिशा ठरवणारी ठरणार आहे.







