पुणे : तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदीच्या तीरावर पैशांची मागणी करण्याच्या कारणावरून तृतीयपंथीयांच्या दोन गटांत वाद झाल्याची घटना घडली. वाद वाढल्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. नदीकाठी उपस्थित वारकऱ्यांसमोरच हा प्रकार घडल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

पैशांची मागणी करण्याच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

या प्रकरणी आळंदी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हाणामारी नेमक्या कोणत्या कारणावरून झाली आणि त्याला सुरुवात कोणी केली, याचा तपास आळंदी पोलीस करीत आहेत.







