पुणे: नवे आर्थिक वर्ष (2026-27) सुरू होताच सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम करणारे मोठे बदल बँकिंग क्षेत्रात होत आहेत. 1 एप्रिलपासून बँकिंग व्यवहारांचे गणित बदलणार असून, विशेषतः एटीएम आणि UPI द्वारे पैसे काढणाऱ्या ग्राहकांसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.

आतापर्यंत अनेक बँकांमध्ये एटीएममधून कार्ड न वापरता केवळ ‘UPI QR कोड’ स्कॅन करून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होती. अनेक ग्राहक या सुविधेचा वापर ‘फ्री ट्रान्झॅक्शन’च्या मर्यादेबाहेरचे व्यवहार म्हणून करत होते. मात्र, बँकांनी आता या पळवाटेला लगाम घातला आहे. 1 एप्रिलपासून तुम्ही UPI द्वारे एटीएममधून काढलेले पैसे देखील तुमच्या महिन्याच्या ठराविक ‘फ्री लिमिट’मध्येच मोजले जातील. सोप्या भाषेत सांगायचे तर, कार्डने पैसे काढा किंवा UPI ने, तुमचे मोफत व्यवहारांचा कोटा आता एकत्रितपणे मोजला जाणार आहे.
त्येक जास्तीच्या व्यवहारासाठी तुम्हाला सुमारे 23 रुपये (करासह) अतिरिक्त मोजावे लागतील. जे ग्राहक छोट्या रकमांसाठी वारंवार एटीएमचा वापर करतात, त्यांची ही मर्यादा महिन्याच्या पहिल्या 10-15 दिवसांतच संपण्याची शक्यता आहे. परिणामी, महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या प्रत्येक विड्रॉलवर भुर्दंड सोसावा लागेल.
जर तुम्हाला अतिरिक्त चार्जेस टाळायचे असतील, तर एकाच वेळी मोठी रक्कम काढणे फायदेशीर ठरेल. वारंवार १००-२०० रुपये काढण्याऐवजी महिन्याचे रोख रकमेचे नियोजन करून एकदाच विड्रॉल करा. तसेच, शक्य असेल तिथे थेट दुकानदाराला UPI ने पेमेंट करा, जेणेकरून एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही.







