दिल्ली : ‘महाराष्ट्राच्या निवडणुकांचा आम्ही अभ्यास केला. या निवडणुकांमध्ये आम्हाला अनियमितता आढळून आली आहे. कारण महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग 5 महिन्यात 39 लाख मतदार कसे आले? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून निवडणुक आयोगाला करण्यात आला आहे. यासोबतच आम्हाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदारांची यादी हवी आहे. नाव, पत्ता आणि फोटोसह ही यादी द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. राहुल गांधी यांची दिल्लीत पत्रकार परिषद पार पडली आहे. त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषेदेत महाराष्ट्रात पार पडलेल्या निवडणूकीवर भाष्य केले. 2019 आणि 2024 या पाच वर्षाच्या काळात 44 लाख मतदार महाराष्ट्रात वाढले. त्यानंतर लोकसभेची 2024 ची निवडणूक आणि विधानसभेची 2024 निवडणूक या काळात 39 लाख नवीन मतदार वाढले. हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येएवढे मतदार वाढले? त्यामुळे हे मतदार कोण आहेत? असा थेट प्रश्न राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.
तसेच राहुल गांधी पुढे म्हणाले की, आम्हाला लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीची मतदारांची यादी हवी आहे, नाव, पत्ता आणि फोटोसहीत यादी हवी आहे. आम्ही याआधीही निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. पण त्यांच्याकडून काहीच उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे काही तरी चुकत असल्याने निवडणुक आयोग आम्हाला उत्तर देत नाही आहे, असा आरोपही निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला आहे.
राहुल गांधींनी तीन प्रश्न हि उपस्थित केले आहेत. ते म्हणले की, हिमाचलच्या लोकसंख्येएवढे 39 लाख मतदार कोण आहेत? आणि कुठून आले? आणि महाराष्ट्रातील युवांची सख्या 9.7 करोड मतदार आहेत, म्हणजे लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान आहे?
काँग्रेसला लोकसभेला कामठी विधानसभा मतदार संघामध्ये 1.36 ला मतं मिळाली आहेत, त्यामुळे लोकसभा आम्ही जिंकलो. भाजपला या निवडणुकीत 1.19 लाख मतं मिळाली. पण या मतदार संघात 35 हजार नवीन मतदार येतात. 35 हजार मतं भाजपला मिळतात आणि ते जिंकतात. हे एक उदाहरण आहे आणि भाजप निवडणुक जिंकते. अशा घटना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या मतदार संघातही घडल्या आहेत, असे सांगत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचे लक्ष्य केंद्रीत केले.
निवडणूक आयोग सरकारची गुलामगिरी करीत आहे…
निवडणूक आयोग सरकारची गुलामगिरी करत आहे, ही 39 लाख मते कुठे जाणार? तर ते आता बिहारमध्ये जाणार आहेत, नंतर यूपीत जातील, हा नवा पॅटर्न झाला आहे, आम्ही लढणारे लोक आहोत, आम्हीच लढणार आहोत, आमचा कसा पराभव झाला हे आम्ही पुढे आणले आहे, निवडणूक आयोगाने घातलेले कफन काढून टाकावे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.