मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या (Munde vs Jarange) हत्येचा कट रचण्यात (Manoj Jarange Patil) आल्याची माहिती समोर आल्यानंतर (Dhananjay Munde) महाराष्ट्रात (Karuna Sharma) खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमोल खुणे आणि दादासाहेब गरड या दोघांना अटक केली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. जरांगे यांनी म्हटले की, धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात षड्यंत्र रचले असून मला मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची डील झाली. ही बैठक भाऊबीजेच्या दिवशी झाली होती, असे त्यांनी सांगितले. या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे आणि स्वतःची ब्रेन टेस्ट करण्याची मागणी केली असून या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हावी, अशी मागणी केली आहे.

या प्रकरणावर करुणा शर्मा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, जरांगे भाऊंनी जे सांगितले की त्यांच्याविरुद्ध कट रचला गेला आहे, ते खरे आहे. धनंजय मुंडे यांचा धंदाच तो आहे. जे त्यांच्या विरोधात जातात, त्यांच्या विरोधात ते कटकारस्थान रचतात. जरांगे पाटील यांच्या लोकांना फोडण्यात आले आणि मला याची माहिती एक महिना आधीच होती. दादा गरड माझ्या घरी तीन वेळा आला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा मोबाईल तपासावा, कारण त्यात धनंजय मुंडे आणि त्यांची रेकॉर्डिंग आहे, असे त्यांनी सांगितले.
करुणा शर्मा पुढे म्हणाल्या की, माझी देखील नार्को टेस्ट व्हायला पाहिजे. पाच लाख रुपये आणि गाडीची बाब या प्रकरणात आहे. दोन नोव्हेंबर रोजी तो माझ्याकडे आला आणि मला पैसे मागितले. मी न्याय मागण्यासाठी जरांगे यांच्याकडे गेले होते. कराड याने मला बेदम मारहाण केली होती, त्याचे CCTV फुटेज आहे. त्याने आपल्या पत्नीला मारले आहे, तो आणखी काय करू शकत नाही? मी मुंडे घराण्याची सून आहे. त्यांनी माझ्यासोबत जे केले त्यामुळे माझी आणि त्यांच्या दोघांचीही नार्को टेस्ट व्हायला हवी. माझ्याकडे पुरावे आहेत आणि वेळ आल्यावर ते दाखवेन. माझ्या मागे कोणी नाही, पण मला न्याय पाहिजे. दादा गरड याची रेकॉर्डिंग मी स्वतः ऐकली आहे. त्याने मला पाच वेळा फोन केला आणि घरी आला होता, असेही करुणा शर्मा म्हणाल्या.
मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांबाबत ते म्हणाले होते की, बीडचा कांचन नावाचा माणूस आहे जो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता किंवा पीए आहे. मुंडे यांनी माझ्या विरोधात षड्यंत्र रचले. बीडच्या कार्यकर्त्यांनी या आरोपींना परळीला नेले होते. तिथे मोठी बैठक झाली होती. त्या बैठकीत धनंजय मुंडे उपस्थित होते आणि त्यांनी या लोकांशी 20 मिनिटे चर्चा केली. मला मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची डील झाली होती. भाऊबीजेच्या दिवशी ही बैठक पार पडली होती. आरोपींनी म्हटले होते की, मला जुनी गाडी द्या, मी गाडीने गाडीला ठोकतो. घातपात करून कोणी मोठे राजकारणी होत नाही. धनंजय मुंडे यांची ही वृत्ती चुकीची आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.







