Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 7 September 2026, 21:51

मुंबई: भारतीय क्रिकेट संघासाठी ३ ऑक्टोबर हा दिवस विशेष ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी भारतीय संघाला दोन वेगवेगळ्या देशांमध्ये सामने खेळावे लागू शकतात. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेटमधील सुवर्णपदकाच्या सामन्यासाठी भारत पात्र ठरल्यास, त्याच दिवशी वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना देखील खेळावा लागणार आहे.

३ ऑक्टोबर रोजी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना मुल्लानपूर, न्यू चंदीगड येथे होणार आहे. त्याच दिवशी २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटच्या सुवर्णपदकाचा सामना जपानमधील निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये होणार आहे. भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत थेट उपांत्यपूर्व फेरीपासून खेळणार आहे. त्यामुळे भारताने अंतिम फेरी गाठल्यास ३ ऑक्टोबरला दोन वेगवेगळ्या देशांत सामने खेळण्याची वेळ येऊ शकते.

सप्टेंबरमध्येही भारतीय संघाचा व्यस्त कार्यक्रम आहे. या महिन्यात भारत एकूण सहा मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहे. १३ सप्टेंबरपासून दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामने सप्टेंबरमध्ये खेळले जाणार आहेत. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचा उपांत्यपूर्व सामनाही याच काळात होणार आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि वैभव सूर्यवंशी यांचा संघात समावेश आहे. हे खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार असल्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा भाग नसतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

 

भारतीय क्रिकेटमध्ये यापूर्वीही असाच योगायोग घडला आहे. १२ सप्टेंबर १९९८ रोजी भारतीय संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सामना खेळला होता. त्याच दिवशी सहारा कपमध्ये पाकिस्तानविरुद्धही भारताचा सामना झाला होता. विशेष म्हणजे भारताने हे दोन्ही सामने जिंकले होते. आता तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय संघाच्या बाबतीत अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले "माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!"

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp