लोणी काळभोर : जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यात व्हीआयपी लोकांचे चोचले पुरवण्यासाठी सामान्य वारकऱ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांच्या अडेलतट्टू कारभारामुळे आणि उपस्थित पोलिसांच्या डोळेझाकीमुळे कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील अथांग गर्दीत चक्क 3 ते 4 आलिशान व्हीआयपी गाड्या थेट घुसवण्यात आल्या.

या अत्यंत बेजबाबदार प्रकारामुळे वारकऱ्यांमध्ये मोठी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या प्रकारानंतर आता देहू संस्थानचे अध्यक्ष आणि कायदा-सुव्यवस्था राखणारे पोलीस प्रशासन यांच्या संगनमतावर चौफेर कडक टीका होत आहे. पालखी सोहळ्यानिमित्त सध्या लोणी काळभोरसह परिसरात अवघा वारकरी संप्रदाय शिस्तीत आणि भक्तीभावाने दाखल झाला आहे.

लोणी स्टेशनसह परिसरात रस्त्यांवर भाविकांची गर्दी असून पाऊल टाकायलाही जागा शिल्लक नाही. अशा संवेदनशील परिस्थितीत सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून काही बड्या राजकीय धेंडांच्या आणि व्हीआयपींच्या गाड्या थेट मुख्य गर्दीत कडक घुसवण्यात आल्या. वृद्ध वारकरी, महिला आणि लहान मुले जिवाची पर्वा न करता दर्शन रांगेत उभे असताना, या गाड्यांनी तिथे कडक धुमाकूळ घातला.
सर्वात मोठा सवाल हा उपस्थित केला जात आहे की, मुख्य मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात असताना या गाड्या गर्दीत घुसल्याच कशा? सामान्य वारकऱ्याने साधे पाऊल पुढे टाकले तरी कडक लाठ्या-काठ्या आणि नियमांचा धाक दाखवणारे पोलीस या ३ ते ४ आलिशान गाड्यांसमोर मुके आणि हतबल का झाले होते? पोलिसांच्या नाकाखाली आणि डोळ्यादेखत या गाड्या आत गेल्याने, या व्हीआयपी गाड्यांना मूक संमती दिली होती का?” असा थेट आणि सवाल आता वारकरी उपस्थित करत आहेत.
दरम्यान, अध्यक्षांचा हा अडेलतट्टू कारभार आणि पोलिसांची ही ढिम्म भूमिका एखाद्या मोठ्या कडक अपघाताला किंवा अनर्थाला आमंत्रण देणारी ठरली असती. अशी भावना लोणी काळभोरसह परिसरातील नागरिक करू लागले आहेत.







