शिरूर : शिरूर येथील सतरा कमानी पुलावरून घोडनदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह अखेर शोधण्यात दौलत शितोळे आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश आले.मृत महिलेकडे असलेल्या पाकिटातील कागदपत्रे व फोटोच्या आधारे मृत महिलेची ओळख पटली असून,आशा दिलीप बोटकर(वय ४८,सध्या रा. कारेगाव,ता.शिरूर; मूळ रा. पारगाव मंगळूर,ता.जुन्नर,जि.पुणे) असे त्यांचे नाव आहे.

गुरुवारी(ता.६)सायंकाळच्या सुमारास आशा बोटकर या सतरा कमानी पुलावर काही वेळ येरझाऱ्या घालत होत्या. त्यानंतर त्या पुलावर बसल्या आणि अचानक घोडनदीच्या पात्रात उडी घेतली.या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.मात्र,नदीपात्रात अंधार व पाण्याचा प्रवाह असल्याने त्यांचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

दरम्यान,आज (दि.८) सकाळी दौलत शितोळे यांच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने घोडनदीच्या पात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली.अथक प्रयत्नांनंतर पथकाला महिलेचा मृतदेह शोधण्यात यश आले. मृतदेहाजवळ सापडलेल्या पाकिटातील कागदपत्रे व फोटोच्या आधारे महिलेची ओळख पटली. त्या कारेगाव (ता.शिरूर)येथे वास्तव्यास असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

मृतदेह श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत आढळून आल्याने या घटनेची नोंद बेलवंडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.या प्रकरणी पुढील तपास बेलवंडी पोलीस करीत आहेत.







