Pune ZP News पुणे, ता. १० : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील स्वच्छता, दैनंदिन व्यवस्थापन आणि पूरक कामकाजाच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिपाई पदाची आवश्यकता तपासून तातडीने कार्यवाही करावे. असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Pune ZP News
पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण भवन, कॅम्प येथून जारी करण्यात आलेल्या या आदेशात शाळांमधील दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी शिपाई पद आवश्यक असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. Pune ZP News

दरम्यान, ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शाळा परिसराची देखभाल, घंटा वाजवणे, कार्यालयीन सहाय्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी कामे आणि इतर पूरक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नसल्याने शिक्षकांनाच ही अतिरिक्त कामे करावी लागत आहेत. त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. Pune ZP News
ग्रामपंचायतींना काय करावे लागणार?
जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, त्यांच्या हद्दीतील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून शिपाई पदाची गरज तपासावी. यासाठी शिक्षण विभागाशी समन्वय साधून विद्यार्थ्यांची संख्या, शाळेचे कामकाज, उपलब्ध कर्मचारी आणि स्थानिक गरजा लक्षात घ्याव्यात.तसेच ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती, निधीची उपलब्धता आणि संबंधित कायदेशीर तरतुदी विचारात घेऊन पुढील निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ६१ तसेच शासन निर्णयानुसार कार्यवाही करणे बंधनकारक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शिक्षकांवरील ताण कमी होणार?
ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिपाई नसल्याने शिक्षकांनाच स्वच्छतेपासून ते प्रशासकीय कामांपर्यंत अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. परिणामी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अध्यापनावर परिणाम होत असल्याचे चित्र होते.या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेला निर्णय शिक्षकांसाठी दिलासादायक मानला जात आहे. शाळांमध्ये शिपाई नियुक्त झाल्यास शिक्षकांना केवळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करता येणार असून, विद्यार्थ्यांनाही अधिक स्वच्छ आणि शिस्तबद्ध वातावरण मिळणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावर वाढणार जबाबदारी
या आदेशामुळे ग्रामपंचायतींची शिक्षण व्यवस्थेतील भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. स्थानिक स्तरावर शाळांच्या गरजा ओळखून निर्णय घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर येणार असून, शिक्षण व्यवस्थापनातील उत्तरदायित्व अधिक स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.सदर आदेश गजानन पाटील यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले असून, जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी याबाबत लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






