Monsoon News पुणे, ता. 17 : देशभरात उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच दिलासादायक बातमी समोर आली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) अंदमान-निकोबार बेटांवर अधिकृत प्रवेश केला असून, यंदा मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता मॉन्सून २६ मेपर्यंत केरळ किनारपट्टीवर धडक देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. Monsoon News

हवामान विभागाच्या माहितीनुसार, आग्नेय बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र तसेच निकोबार बेटांच्या काही भागांत मॉन्सून सक्रिय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अंदमान-निकोबार बेटांवर मध्यम ते जोरदार पावसाची नोंद होत असून, वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. Monsoon News
या भागात पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढला असून, ताशी ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. काही ठिकाणी ४५ किलोमीटर वेगाने वाऱ्याचे झोतही अनुभवास येत आहेत. अंदमान समुद्रात सुमारे ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत पश्चिम वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. ढगांची दाटी, पावसाची वाढलेली तीव्रता आणि वातावरणातील बदल यामुळे मॉन्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा करण्यात आली. Monsoon News
हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत मॉन्सून संपूर्ण अंदमान-निकोबार बेटांवर व्यापेल, तसेच बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग आणि दक्षिण अरबी समुद्रातही पुढे सरकेल, असा अंदाज वर्तवला आहे. Monsoon News
विशेष म्हणजे, यंदा अरबी समुद्रात मॉन्सूनचे आगमन सरासरीपेक्षा जवळपास सहा दिवस आधी झाले आहे. त्यामुळे केरळमध्येही यंदा मॉन्सून वेळेआधी दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गतवर्षी १३ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमान भागात पोहोचला होता, तर २४ मे रोजी केरळमध्ये त्याचे आगमन झाले होते. महाराष्ट्रातील तळ कोकण किनारपट्टीवर २५ मे रोजी मोसमी पावसाने हजेरी लावली होती. यंदाही मे महिन्याच्या अखेरीस राज्यातील पावसाचा सविस्तर आणि विभागनिहाय अंदाज जाहीर केला जाणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. Monsoon News







