Jalna Crime : जालना जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आला आहे. भोकरदन तालुक्यातल्या जवखेडा बुद्रुक शिवारात ऊस तोडीच्या पैशावरून झालेल्या वादातून तब्बल चाळीस वर्षांच्या उषाबाई सदाशिवे यांचा खून करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. उषाबाई सदाशिवे यांचा दुपारच्या सुमारास कापसाच्या शेतात त्यांचा मृतदेह पडलेला आढळला आणि गावात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता या महिलेला गळा आवळून खून केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर तपासाची चक्रं वेगात फिरली आणि ऊस तोडीचा मुकादमाला ताब्यात घेतलं. मुकादम शरद राऊत हा संशयित म्हणून ताब्यात घेतला असता चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली, त्यामुळे त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय.







