पुणे : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीविषयी,महत्वाची माहिती दिली आहे.राज्यातील 533 पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी सरकारने जाहीर केली होती. आता दुसऱ्या यादीत 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.मात्र कर्जमाफीसाठीची अट काय असेल हे पण कृषिमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारने राबवलेल्या कर्जमाफी मोहिमेमुळे लाखो थकबाकीदार शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होणार आहे. सरकाकडून 22 जुलै रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून 533 पात्र शेतकऱ्यांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात तब्बल 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.

सरकारकडून टप्प्याटप्प्याने ही योजना लागू केली जात असून, येत्या काळात 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीचा थेट लाभ पोहोचवला जाणार आहे.
प्रमुख अटी आणि मिळणारे फायदे
१. कर्जमाफीची मर्यादा: ज्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज थकीत आहे, त्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले जाईल.
२. अटी व कागदपत्रे: कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य आहे. तरच या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
३. तात्काळ निधी वितरण: कागदपत्रांची पडताळणी पूर्ण होताच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम त्वरित वर्ग केली जाईल.
४. निधीची तरतूद: राज्य शासनाने या योजनेसाठी 40 हजार कोटी रुपयांच्या भरीव निधीची व्यवस्था केली आहे.
सरकारकडून सध्या प्रसिद्ध झालेल्या यादीत नाव नसले, तरीही काळजी करण्याची गरज नाही. कागदपत्रांची पडताळणी व त्रुटी दुरुस्ती पूर्ण झाल्यावर पुढील याद्यांमध्ये उर्वरित शेतकऱ्यांची नावे समाविष्ट केली जातील, असे आश्वासन कृषीमंत्र्यांनी दिले आहे.






