नारळाच्या पाण्यामध्ये नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरासाठी फायदेशीर ठरते.
नारळाचे पाणी पिण्याचे फायदे:
1. हायड्रेशनसाठी उत्तम उपाय: नारळाचे पाणी नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स (पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम) ने समृद्ध असल्यामुळे, ते शरीराला त्वरीत हायड्रेट करते आणि उन्हाळ्यात होणारी पाण्याची कमतरता भरून काढते.
2. ताप कमी करण्यास मदत: नारळाचे पाणी शरीराचे अंतर्गत तापमान संतुलित ठेवते. उष्णतेचा त्रास, अंगात जळजळ किंवा उन्हाळ्याचा ताप यावर ते गुणकारी आहे.
3. ऊर्जा आणि थकवा कमी करणे: उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील क्षार बाहेर पडतात. नारळाचे पाणी ते नैसर्गिकरीत्या थकवा दूर होतो आणि ताजेतवाने वाटते.
4. पचन सुधारते: नारळाच्या पाण्यात असणारे नैसर्गिक एन्जाईम्स पचन सुधारण्यास मदत करतात. अॅसिडिटी आणि अपचनावरही उपयोगी आहे.
5. त्वचा निरोगी ठेवते: यामधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला हायड्रेट ठेवतात व नैसर्गिक चमक आणतात. उन्हाळ्यात येणाऱ्या गरमीच्या फोडांवर किंवा पुरळांवर देखील ते गुणकारी असते.
6. रक्तदाब नियंत्रणात ठेवते: पोटॅशियमच्या भरपूर प्रमाणामुळे नारळाचे पाणी उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.
7. लघवी साफ होते: नारळाचे पाणी मूत्रवर्धक असल्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकते आणि किडनीसाठी उपयुक्त ठरते.
नारळाचे पाणी सकाळी किंवा दुपारी प्यायल्यास जास्त फायदेशीर ठरते.