पुणे : महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात नुकतीच राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांची हिंगोली येथे दौऱ्यादरम्यान तसेच मंञालयात भेट घेवून निवेदन सादर केले आहे. यावेळी राज्याच्या या दोन्ही सर्वोच्च प्रतिनिधींनी याबाबत माहिती घेणेकरीता कुलगुरुंशी संपर्क केला असता ते “नॉट रिचेबल” असलेचे निदर्शनास आलेले आहे.
मुख्यमंञी यांनी अधिष्ठाता यांना दोनवेळा संपर्क करुन या मागण्यांवर तोडगा काढणेस निर्देशित केले आहे. माञ मंञालयात कुलगुरुंच्या राज्याच्या मुख्यमंञ्यांचा फोन न घेणेची व “नॉट रिचेबल” असणेची जोरदार चर्चा अधिकारी वर्गात दिसून आली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी नॉट रिचेबल असलेले कुलगुरु हे किमान मुख्यमंञी यांचेसाठी तरी रिचेबल असतील अशी असलेली अपेक्षा फोल ठरली. यामुळे विद्यापीठात नेमक चाललय काय याची चर्चा चव्हाट्यावर आली आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ हे देशातील अग्रगण्य विद्यापीठ आहे. संशोधना प्रमाणेच येथील स्पर्धा परीक्षा उत्तीर्णतेचा टक्कादेखील अव्वल राहिला आहे. विशेषतः शेतकरी व भुमिहीन शेतमजूर यांचे गरीब कुटूंबातील विद्यार्थी अहोराञ मेहनत करुन यश मिळवत असतात. परंतू अशा विद्यार्थ्यांना प्रेरणा व सुविधा देवून कल्याणकारी राज्याचा आदर्श वस्तुपाठ ठेवायचा सोडून या विद्यार्थ्यांना विद्यापीठाबाहेर काढून देणेकरीता विद्यापीठ प्रशासन अहोराञ परिश्रम घेत असलेले दिसून येत आहे. होतकरु विद्यार्थ्यांना बाहेर काढणेसाठी अक्षरशः पोलीस बळाचा मदतीकरीता दिलेल पञही माध्यमांमध्ये फिरत आहे. यामुळे विद्यापीठात नेमक चाललय काय? याची चर्चा जोर धरत आहे.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे उद्योग क्षेञाबरोबर बाजारपेठ न मिळाल्याने शेती करणारे शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत. यातच अतिवृष्टी, नापिकी यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. यातील अभ्यासू मुले कृषि पदवीसह स्पर्धापरीक्षेकडे वळतात व घवघवीत यश मिळवतात. अशी परिक्षेची तयारी करताना पदव्युत्तर शिक्षणानंतरही अनेक वर्षे कधीकधी तयारी करावी लागू शकते. परंतू आर्थिक परिस्थिती नसलेने असे विद्यार्थी वस्तिगृहात राहूनच तयारी चालू ठेवतात. यापूर्वी अनुकूल भुमिका घेत गेली ४० वर्षे विद्यापीठ प्रशासनाने यात कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. उलट यास प्रेरणाच दिलेली आहे. एव्हाना माजी कृलगुरु श्री सुभाष पुरी यांनी अशा विद्यार्थ्यांकरीता आय ए एस प्रशिक्षण केंद्र विद्यापीठात सुरू करणेसाठी जोरदार प्रयत्न केलेले होते.
तथापि सध्या असलेले कुलगुरु व प्रशासन यात वारंवार हस्तक्षेप करत हि चळवळच मोडून काढणेचा प्रयत्न करीत असलेचे निदर्शनास येते. यात राञंदिवस वस्तिगृहाची तपासणी करणे, अनोंदणीकृत विद्यार्थ्यांना वस्तिगृहाबाहेर काढणेसाठी खाजगी सुरक्षारक्षकांसह पोलीसी बळाचा वापर करणे, वाचनालय वापरणेस मज्जाव करणे असे प्रकार दैनंदिन स्तरावर सुरू आहेत. यास ञस्त विद्यार्थ्यांनी स्वतःची बाजू मांडणेकरीता कुलगुरुंची अनेकदा भेट मागूनही ते “नॉट रिचेबल” आहेत. आपली व्यथा नाईलाजाने विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व मंञी मा. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांकडे विद्यार्थ्यांनी मांडली आहे. यावेळी सदर मंञी यांनी संपर्क केला असता कुलगुरु त्यांनादेखील “नॉट रिचेबल” असलेचे प्रत्यक्ष उपस्थित असलेले विद्यार्थांनी सांगितले.
याशिवाय कुलगुरू व प्रशासन किमान मुख्यमंत्री व उपमुख्यमंञी यांचेशी तरी चर्चा करुन तोडगा काढेल या आशेने मंञालय गाठलेले विद्यार्थ्यांनी आपली व्यथा राज्याच्या या सर्वौच्च प्रतिनिधींपुढे मांडलेली आहे. माञ त्यांच्यादेखील फोनकरीता कुलगुरु हे “नॉट रिचेबल” असलेची मोठी चर्चा मंञालय स्तरावर सुरु असलेचे निदर्शनास येते. यामुळे सध्या हे ञस्त विद्यार्थी उघड्यावर दिवस काढीत आहेत. कोणी झाडाखाली तर कोणी रस्त्यावर अभ्यास करत आहेत. राहत असलेले ठिकाण हे अतिशय अस्वच्छ असून अशा विद्यार्थ्यांना कोरोना स्वाईन फ्ल्यु, कोरोना आदी झालेस मोठा धोका उद्भवू शकतो. हे जीवाशी खेळणेसारखे आहे. सन्मानाने आयुष्य जगणेची संधी म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्शभुमीवर असे उघड्यावर दिवस काढावे लागत आहेत. यातून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.
आज होवू घातलेली पदयाञा व मूक मोर्चा राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्या घेत असलेल्या बैठकीच्या दिलेल्या आश्वासनामुळे दोन दिवसांकरीता स्थगित करण्यात आलेला आहे. याबैठकीतून तोडगा निघेल अशी विद्यार्थ्यांना आशा आहे. याबरोबरच आतापर्यंत नॉट रिचेबल कुलगुरु याबैठकीस तरी रिचेबल म्हणजेच उपस्थित राहतात का? कुलगुरु प्रतिसाद देतात का? हा देखील चर्चेचा विषय ठरत आहेत.