नवी दिल्ली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कारण, यातून चांगला परतावा मिळत आहे. असे असताना आता शेअरने नाहीतर सोन्याने चांगला परतावा दिल्याचे समोर आले आहे. गुंतवणूकदारांसाठी सोने हा सुरक्षित पर्याय मानला जातो. त्यामुळे यातील गुंतवून वाढत आहे.

गेल्या दोन वर्षांत सोन्याने इक्विटी (स्टॉक मार्केट) पेक्षा जास्त कामगिरी केली आहे. सोने आणि निफ्टी 50 ची तुलना करण्यात आली. यात सोन्याने 2000 पासून 2027 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या बेंचमार्क निर्देशांकाने 1470 टक्के परतावा दिला आहे. कठीण काळातही सोने चांगली कामगिरी करताना दिसले. 2008 च्या आर्थिक मंदी आणि कोरोना महामारीच्या काळातही सोन्याने चांगली कामगिरी केली.

भारतीय गुंतवणूकदारांसाठी सोने हा चांगला पर्याय असल्याचे सांगितले जाते. सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB) यापुढे उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचा गोल्ड ईटीएफ हा सर्वोत्तम मार्ग असू शकतो.आर्थिक मंदीच्या काळात निफ्टी घसरला, पण सोने स्थिर राहिले. त्यामुळे सोन्याची स्थिती चांगली झाल्याचे दिसून आले.








