Shirur News : न्हावरे, (पुणे) : शिरूर तालुक्यातील उरळगाव येथे एका तरुण शेतकऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (ता. 27) घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विशाल गेनभाऊ होलगुंडे (वय २६, रा. उरळगाव, ता. शिरूर)असे मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबतची खबर मयताचे चुलते भानुदास आप्पा होलगुंडे (वय-५५) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. Shirur News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल होलगुंडे हे आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत होते. दरम्यान विहिरीतील पाण्याची पातळी पाहण्यासाठी ते विहिरीजवळ गेले असता अचानक पाय घसरून त्यांचा तोल गेला आणि ते थेट विहिरीत पडले. यावेळी आई अलका होलगुंडे यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विशाल पाण्यात बुडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ आरडाओरडा करत मदतीसाठी हाक दिली. आवाज ऐकून जवळच शेतात काम करणारे भानुदास होलगुंडे व इतर शेतकरी घटनास्थळी धावून आले. Shirur News
दरम्यान, स्थानिकांच्या मदतीने विशाल यांना विहिरीतून बाहेर काढून तातडीने न्हावरे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या दुर्दैवी घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दीपक पवार करीत आहेत. Shirur News
ग्रामीण भागात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष?
या घटनेमुळे पुन्हा एकदा शेतातील विहिरींना संरक्षक कठडे नसणे, सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव आणि निष्काळजीपणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. Shirur News







