Pune News पुणे, ता. ८ : नसरापूर आणि दक्षिण म्हाळुंगे येथील अत्याचारग्रस्त पीडित कुटुंबांना महाराष्ट्र शासनाच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत प्रत्येकी १० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या तातडीच्या हालचालीमुळे अवघ्या आठ दिवसांत मदतीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे. Pune News
राजगड आणि दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या अत्यंत गंभीर व संवेदनशील घटनांतील पीडितांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेतला. नसरापूर येथील पीडित बालिकेच्या वारसांना आणि दक्षिण म्हाळुंगे येथील पीडित बालकाच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. या संदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी तातडीने समितीची बैठक बोलावून सर्व कागदपत्रांची तपासणी केली. चर्चेनंतर दोन्ही प्रकरणांमध्ये आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले. Pune News

महाराष्ट्र शासनाची ‘मनोधैर्य’ योजना बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, अॅसिड हल्ले तसेच ज्वलनशील पदार्थांद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्यांतील पीडितांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येते. या योजनेतून पीडितांना प्रकरणाच्या स्वरूपानुसार दहा लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते. योजनेनुसार मंजूर रकमेपैकी २५ टक्के रक्कम तात्काळ दिली जाते, तर उर्वरित ७५ टक्के रक्कम पीडित किंवा त्यांच्या पालकांच्या नावाने १० वर्षांसाठी मुदतठेव स्वरूपात जमा करण्यात येते. Pune News
प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी सांगितले की, पीडितांना तात्काळ वैद्यकीय मदत, मानसिक आधार आणि पुनर्वसनासाठी ‘वन स्टॉप सेंटर’च्या माध्यमातून सहाय्य केले जाते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याद्वारेही आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जाते. Pune News
यावेळी महेंद्र महाजन यांनी सांगितले की, “आर्थिक मदतीने झालेले नुकसान भरून निघणार नसले तरी पीडितांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी ही मदत महत्त्वाची ठरेल. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पीडितांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे.”







