मध्य प्रदेश : विवाहित प्रियसीची हत्या करून दोन दिवस मृदेहासोबतच झोपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, या घटनेतील आरोप पोलिसांच्या तावडीतून पळून गेला असल्याची माहिती मिळत आहे. ही नेमकी घटना काय आहे? सविस्तर जाणून घेऊया…
मध्य प्रदेश मधील निवारी जिल्ह्यातील राजपुरा गावात राहणारा रतिराम राजूपत याचे त्याच्यांच्या गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. काही काळानंतर महिलेचे दुसऱ्या पुरुषाशी लग्न झाले. मात्र, महिलेले रतिराम राजूपत सोबतचे प्रेमसंबंध सुरूच ठेवले. लग्नानंतरही दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरु होते. लग्नाच्या काही दिवसानंतर महिलेने आपल्या पतीला सोडून रतीरामशी लग्न करण्याचा निर्णय घेत वारंवार त्याच्यावर दबाव टाकू लागली होती.

या दबावाने रतिराम अस्वस्थ झाला होता. तो तणाव जाऊ लागला होता. अशातच त्याने प्रियसीला संवण्याचा निर्णय घेतला. आणि आपल्या मित्रांसह तिच्या हत्येचा कट रचला. २ ऑक्टोबरच्या रात्री, आरोपीने आपल्या प्रेयसीला घरी बोलावले. रात्री दोघांमध्ये पुन्हा शारीरिक संबंध निर्माण झाले. पण त्याचवेळी रतीरामने तिचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने मित्र कालीचरण, मुकेश आणि ज्ञान सिंह यांना घरी बोलवले आणि त्यांच्या मदतीने घराच्या मातीच्या फरश्याखाली खोल खड्डा खोदून मृतदेह जमिनीत पुरला. पुरलेल्या जागेला माती आणि शेणाने लेपून घेण्यात आले. त्यावर पलंग टाकण्यात आला आणि आरोपी दोन दिवस त्याच ठिकाणी झोपत राहिला.
महिला बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे रतीरामला ताब्यात घेतले. त्याची चौकशीत केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. मात्र, आरोपी पोलिस कोठडीत असताना शौचालयात जाण्याच्या बहाण्याने ठाण्यातून फरार झाला. अशा निष्काळजीपणाबद्दल दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, फरार आरोपी व त्याच्या मित्रांचा शोध सुरू आहे.







