पुणे: पुणे महानगरपालिकेच्या लष्कर जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशन येथे विद्युत व यांत्रिकी देखभाल-दुरुस्तीची तातडीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवार, ३० जुलै रोजी या केंद्रांतर्गत येणाऱ्या अनेक भागांचा पाणीपुरवठा संपूर्ण दिवस बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार, ३१ जुलै रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

रामटेकडी टाकी परिसरातील काळेपडळ, गाडीतळ, गोंधळेनगर, सातववाडी, हडपसर गावठाणचा काही भाग, महंमदवाडी गावठाण, वाडकर मळा, कृष्णानगर, राजीव गांधीनगर, तरवडे वस्ती, रामनगर झोपडपट्टी, रामटेकडी एसआरपीएफ, वैदुवाडी, भीमनगर, शिवदेवस्ती, सय्यदनगर, माळवाडी, मुंढवा, मगरपट्टा सिटी, केशवनगर, साडेसतरा नळी, रस्तोबा नगर, काळे बोराटेनगर, हांडेवाडी रोड आणि मुजावर वस्ती या भागांचा पाणीपुरवठा बंद राहील.

वानवडी टाकी परिसरातील वानवडी गावठाण, चौगुले मळा, शितळादेवी मंदिर परिसर तसेच बकरी हिल टाकीअंतर्गत कोंढवा गावठाण, शिवनेरीनगर, मिठानगर, पारगेनगर, कौसरबाग, साळुंखे विहार, एनआयबीएम रोड, उंड्री रोड, आझादनगर, शांतिनगर, केदारीनगर, काळे मैदान, माने वस्ती, जांभूळकर वस्ती, जगताप चौक, विकासनगर, शिंदे छत्री परिसर, संविधान चौक ते गंगा सॅटेलाइट चौक आणि सिद्धार्थनगर या भागांनाही पाणी मिळणार नाही.
हाय सर्व्हिस टाकी परिसरातील बी.टी. कवडे रोड, घोरपडीचा काही भाग, भारत फोर्ज परिसर, सेंट पॅट्रिक टाउन, होले मळा, एस. व्ही. नगर, लक्ष्मीनगर, तारादत्त कॉलनी, डांबरवाडी, ज्ञानेश्वर पार्क, पुणे कॅन्टोन्मेंट, कॅम्प, कमांड हॉस्पिटल, मोदीखाना, एम. जी. रोड आणि ईस्ट स्ट्रीट परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
याशिवाय कॅम्प व रेसकोर्स टाकी परिसरातील संपूर्ण कॅन्टोन्मेंट, कॅम्प वसाहत, घोरपडीचा काही भाग, श्रावस्तीनगर, गुलमोहर पार्क, पासपोर्ट कार्यालय परिसर आणि कोरेगाव पार्क ब्रिज परिसरातही पाणीपुरवठा बंद राहील.
ठाकरसी टाकीअंतर्गत येरवडा गावठाण, इराणी मार्केट, गुंजन, कामराजनगर, नेताजीनगर, गांधीनगर, काश्मीर कॉलनी, भीमाशंकर वसाहत, यशवंतनगर, नवी खडकी, संगमवाडी, नगर रोड, डेक्कन लाइन आणि कल्याणीनगर परिसरातही पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.
खराडी पंपिंग स्टेशनअंतर्गत खराडी गावठाण, इऑन आयटी पार्क परिसर, चंदननगर, सुतारनगर, धर्मनगर, सोमनाथनगर, गणेशनगर, आनंद पार्क, राजश्री कॉलनी, महावीरनगर, माळवाडी आणि परिसरातील नागरिकांनाही या देखभाल कामांचा फटका बसणार आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी नागरिकांनी आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन केले आहे.






