पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. या बदलामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

मुंबई, ठाणे आणि लगतच्या किनारपट्टी भागात मान्सून सक्रिय झाला असून हवामान विभातर्फे योग्य ते सतर्कतेचे इशारे देण्यात आले आहेत. विशेषतः पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे प्रशासनाने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे शहर आणि विशेषतः घाटमाथ्यावरील परिसरामध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात हवामान विभातर्फे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. धरण क्षेत्रामध्ये पाऊस होत असल्यामुळे नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींसह विजांच्या कडकडाटा पाऊस पडत आहे. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात झालेली ही मान्सूनची वाढती सक्रियता शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या साठ्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.






