सोलापूर: सोलापूरच्या एमआयडीसी परिसरातील आकाशवाणी केंद्राजवळ शुक्रवारी रात्री एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली. एका एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय रिक्षाचालक सिद्धाराम कैलास कटप याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सिद्धारामचे लग्न अवघ्या एका वर्षापूर्वीच झाले होते. त्याचे वैवाहिक जीवन सुखात सुरू होते, परंतु हे सुख संतोष महादेव पाटील याला पाहवले नाही. संतोषने यापूर्वी श्रुतीला लग्नासाठी मागणी घातली होती, मात्र तिने त्याला स्पष्ट नकार देऊन सिद्धारामची निवड केली होती. हा अपमान आणि त्यातून निर्माण झालेला द्वेष संतोषच्या मनात घर करून बसला होता.

१७ जून २०२६ रोजी विशाल आणि संतोष यांच्यातील संभाषणातून सिद्धारामला मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाली. ही बाब सिद्धारामचा मित्र रियाज शेख याने त्याला सांगितली. यावर जाब विचारण्यासाठी सिद्धाराम संतोषला भेटायला गेला असता, संतोषने पूर्ववैमनस्यातून आपल्याजवळील धारदार चाकूने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. गळ्यावर आणि पाठीवर सपासप वार केल्यामुळे सिद्धाराम गंभीर जखमी झाला. दरम्यान, मध्ये पडलेल्या प्रमोद पाटील यांनाही आरोपीने जखमी केले.
उपचारासाठी सिद्धारामला तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी संतोष महादेव पाटील याला बेड्या ठोकल्या. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.







