गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातुन विषबाधेची मोठी घटना समोर आली आहे. येथे लग्नाच्या जेवनातून 55 ते 60 लोकांना विषबाधा झाली आहे. ही घटना गोरेगाव तालुक्यातील बबई येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव तालुक्यातील बबई येथील केशोवराव बिसेन यांच्या येथे लग्न समारंभ होता. यामध्ये लग्नातील जेवणातून विषबाधा झाली. यामध्ये 8 बालकांचा समावेश असून चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, लग्नात विषबाधा झालेल्या 26 जणांवर गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात तर उर्वरित लोकांवर प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित 17 लोकांवर गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे. मात्र या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.