जळगाव : घरातील लग्नकार्य आटोपल्यानंतर पाहुणे मंडळींसोबत कुटुंबिय शिरसोली येथील सज्जनशाह बाबा यांच्या दर्ग्यावर गेले होते. त्या परिसरात काही मुली खेळत असताना तीन जणांचा पाय घसरुन त्या नायगाव धरणाच्या पाण्यात बुडाल्या. नातेवाईकांनी पाण्यात उडी घेत दोन मुलींना वाचवले. मात्र खुशी अरमान पटेल (वय १४, रा. फातेमा नगर) हीचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला.
ही घटना गुरुवार २४ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील फातेमा नगरात अरमान पटेल है वास्तव्यास असून १८ एप्रिल रोजी त्यांच्या मोठ्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला.