बीड: गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बीड जिल्ह्यात एक भयानक हत्याकांड घडले ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. ही घटना गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी धारूर तालुक्यातील कन्नापूर (मोहा) गावातील एका शेतात घडली. पीडित आणि आरोपी चुलत भाऊ आहेत. पीडित स्वप्नील रामकिसन देशमुख (२८) याच्यावर त्याचा चुलत भाऊ संतोष आबा देशमुख याने तलवारीने हल्ला करत मुंडके छाटून नंतर दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली आहे. दोघांमध्ये पूर्वीपासून वैर होते आणि हत्येमागील हेतू हा दीर्घकाळ चाललेला वाद असल्याचे मानले जात आहे.
दोन वर्षांपूर्वी स्वप्नीलने संतोषला मारहाण केली होती. म्हणून संतोषचा एक भाऊ अविनाश देशमुखने आत्महत्या केली होती. तो दिवस गुढीपाडव्याच्या दोन दिवस नंतरचा होता. तेव्हापासून संतोष बदला घेण्याचा प्रयत्न करत होता. आणखी एक कारण असे सांगितले जात आहे कि, दोन वर्षांपूर्वी स्वप्नील देशमुख याच्या मानसिक जाचास कंटाळून संतोषचा भाऊ अविनाश देशमुख यांनी आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी स्वप्नील देशमुख याच्यावर गुन्हा दाखल होता. हा गुन्हा मागे घे म्हणून स्वप्नीलहा संतोष देशमुख याच्यावर दबाव आणत होता. हत्या करण्यात आली त्यादिवशी स्वप्नील नशेत होता आणि तो संतोषला त्रास देत होता. दरम्यान, त्रास सहन न झाल्यामुळे संतोषने स्वप्नीलची हत्या केली. ज्या झाडाखाली संतोषचा भाऊ अविनाश देशमुखने आत्महत्या केली होती त्याच झाडाखाली संतोषने स्वप्नीलची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपीने गुन्हा केल्यानंतर सिरसाळा पोलिस ठाण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या प्रकरणी तपास सुरू आहे आणि संतोषविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने समाजात शोककळा पसरली आहे, अनेकांनी या क्रूर हत्येबद्दल संताप आणि दुःख व्यक्त केले आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि न्याय मिळेल असे आश्वासन दिले आहे.