दुबई: आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मधील बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना काल पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 7 विकेट्सने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. नाणेफेक जिंकूनही पाकिस्तानला हा सामना जिंकता आला नाही. या सामन्यादरम्यान आणि सामन्यानंतरही एक मोठा वाद चर्चेत राहिला, तो म्हणजे भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही.

सूर्यकुमार यादवने दिले खतरनाक स्पष्टीकरण
सामना संपल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि त्याच्या संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. टॉसच्या वेळीही सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन करणे टाळले होते. यावर सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने स्पष्टीकरण दिले. त्याने सांगितले की, “आम्ही बीसीसीआय आणि सरकारशी पूर्णपणे सहमत आहोत. आम्ही इथे फक्त खेळण्यासाठी आलो आहोत, असा निर्णय आम्ही घेतला होता. आम्ही याला एक कडक उत्तर दिले आहे.”
येथे पाहा व्हायरल व्हिडीओ:
पहलगाम हल्ल्याचा उल्लेख
एका पत्रकाराने ‘खेळाडूवृत्ती’बद्दल प्रश्न विचारल्यावर सूर्यकुमार म्हणाला की, “जीवनात काही गोष्टी खेळाडूवृत्तीच्या पलीकडच्या असतात.” त्याने पुढे सांगितले की, “आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सर्व पीडितांसोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहोत आणि हा विजय ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये सहभागी असलेल्या आमच्या सैनिकांना समर्पित करतो.”
या विजयामुळे आणि सूर्यकुमारच्या स्पष्ट भूमिकेमुळे देशभरातून त्याचे कौतुक होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंधांवर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे.







