लोणी काळभोर : अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेसाठी मराठा तरुणांनी उद्योजक होण्यासाठी पहिले पाऊल टाकावे आणि मराठा तरुणांनी उद्योजक होण्यासाठी पुढे यावे. त्यासाठी आम्ही व बँका पुढील सर्व प्रक्रिया करून मराठा तरुण-तरुणींना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम असल्याचे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर व मराठा महासंघ हवेली तालुका, यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा उद्योजक व कर्ज विषयक मेळाव्याचे आयोजन कुंजीरवाडी येथील धनश्री लॉन्स येथे करण्यात येणार आले होते. यावेळी बोलताना नरेंद्र पाटील यांनी जास्तीत जास्त तरुणांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाचा फायदा घेऊन उद्योजक तयार होत असल्याचे सांगितले. छोटे-छोटे उद्योगातून सुद्धा मराठी तरुण पुढे येत असून त्यांना महामंडळाच्या वतीने पाठबळ दिले जात आहे.
मराठी तरुणांना उदयोजक होण्यासाठी आर्थिक पाठबळ महामंडळ देऊन मराठी तरूणांना मध्ये जिद्द, कष्ट व चिकाटी असेल तर मराठी तरूण नक्कीच यशस्वी उदयोजक होईल असे नरेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले. अण्णासाहेब पाटील महामंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी भरघोस निधी दिला असून त्यातून अनेक मराठी उद्योजक तयार होतील असा विश्वास नरेंद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकमंगल सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले की, लोकमंगल बँक सर्व प्रकारच्या व्यवसाय वाढीसाठी व व्यावसायिक वाहन खरेदीसाठी कर्ज देत असून त्यातून अनेक नागरिकांना याचा लाभ झाला आहे. कृषी संलग्न, लघु मध्यम उद्योगासाठी, उत्पादन व्यापार विक्री सेवा तसेच गट प्रकल्प कर्ज सुद्धा लोकमंगलतर्फे उपलब्ध करून दिले आहे. पर्यटन विकास वाढीसाठी सुद्धा लोकमंगलतर्फे कर्ज दिले जात आहे.
यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले की, मराठा समाज समाजातील तरुण तरुणींनी जास्तीत जास्त उद्योजक होऊन महामंडळाचा व बँकांचा फायदा घ्यावा. या कार्यक्रमास गुलाबराव गायकवाड राष्ट्रीय सरचिटणीस मराठा महासंघ, लोकमंगल बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप नागणे, प्रकल्प पर्यटन अधिकारी मयूर नांद्रे, लोकमंगल पतसंस्थेचे संचालक शिवाजी माळी, बँकेचेअधिकारी सुदन सुरवसे बँकेचे, शाखाधिकारी अंकुश गायकवाड कुणाल खरोटे आदी उपस्थित होते .
या कार्यक्रमास विशेष सहकार्य प्रभाकर धुमाळ व निलेश सुंबे यांचे लाभले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिन सुंबे, गजानन जगताप, सचिन माथेफोड, अनिरुद्ध मराठे, चंद्रकांत दुंडे, भाऊ जाधव, दीपक गोते, सुभाष कड यांनी प्रयत्न केले.






