पुणे: परंदवडी येथील कै. साथी बा.न राजहंस विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष १९९९-२००० च्या इयत्ता १० वीत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी सुमारे २५ वर्षांनी एकत्र येवून त्या वयातील आठवणी ताज्या केल्या आणि पुन्हा दहावीला बसण्याचा मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रथमतः याच विद्यालयातील दिवंगत शिक्षक आणि कर्मचारी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रम सुरु करण्यात आला. यानंतर काही माजी विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात त्या काळातील आठवणींना उजाळा देताना काहींनी आपल्या अश्रुना वाट मोकळी करून दिली तर काहींनी त्या दिवसाचे महत्व काय आहे हे सांगितले. आजही त्या दिवसाची आठवण झाली तर काही काळ का होईना जबाबदारी नाही आणि स्वच्छंद आयुष्य जगत होतो. अशी भावना काही काळ का होईना मनाला आनंद देवून जाते. ते इतके जादुई दिवस होते. असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.
शाळेचे जेष्ठ शिक्षक रावसाहेब थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले. तर मुख्याध्यापक विठ्ठल माळशिकारे यांनी बोलताना सांगितले की तुम्ही शाळेशी असलेली आत्मियता आणि नाळ आजही टिकवून ठेवली आहे.