पुणे: पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथे घडलेल्या एका (Shirur News) हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या (Pabal News) एका विवाहित महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. (Pune Crime)

अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव वय 30, त्यांचा 5 वर्षांचा मुलगा सार्थक आणि अवघ्या 4 महिन्यांची मुलगी गौरी अशी या दुर्दैवी घटनेतील मृतांची नावे आहेत. जाधव कुटुंब मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी गावचे असून रोजगारासाठी काही काळापासून पाबळ येथील थोर स्थळ वस्ती परिसरात वास्तव्यास होते. अहिला या मजुरी करून घरखर्च चालवत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अहिला आणि त्यांचे पती राजू जाधव यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. त्यानंतर अहिला आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या. बराच वेळ होऊनही त्या घरी परत न आल्याने दुपारनंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.
दरम्यान, थोर स्थळ परिसरातील एका शेतातील विहिरीत प्रथम लहान मुलीचा मृतदेह आढळून आला. ही बातमी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली. पुढील शोधात त्याच ठिकाणी अहिला आणि त्यांच्या मुलाचाही मृतदेह आढळून आला. एकाच कुटुंबातील तीन जीव अशा प्रकारे निघून गेल्याने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला.
प्राथमिक तपासात पतीकडून वारंवार संशय आणि त्यातून होणारे वाद यामुळे अहिला मानसिक तणावाखाली असल्याची माहिती पुढे आली आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.







