बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार (Sharad Pawar) यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, आज बारामतीत पत्रकारांशी बोलतांना शरद पवार यांनी केलेल्या तीन स्फोटक विधानांमुळे या सर्व शक्यतांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या निवडीवरून पवार कुटुंबातील आणि पक्षातील अंतर्गत दरी आता चव्हाट्यावर आली आहे.

काय घडलं आणि शरद पवार काय म्हणाले?
अजितदादांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “मला या शपथविधीबद्दल काहीही माहिती नाही. मी बारामतीत आहे, मग सोहळ्याला कसा जाणार?” पवारांच्या या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. इतका मोठा निर्णय घेताना ज्येष्ठ नेत्याला साधे कळवलेही जाऊ नये, याचा अर्थ अजित पवार गटाने स्वतः हा निर्णय घेतला असल्याचे समोर येते.
एकत्र येण्याच्या मुद्द्यावर पवारांनी मोठे गुपित उघड केले. “अजित पवार, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यात चार महिन्यांपूर्वी सकारात्मक चर्चा सुरू होती. ते एका ठोस प्रक्रियेपर्यंत पोहोचले होते. मात्र, दादांच्या निधनामुळे त्या प्रक्रियेत आता मोठा खंड पडला आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तिक अधिकार असल्याचे सांगत शरद पवारांनी या प्रकरणातून स्वतःला पूर्णपणे बाजूला केले आहे.







