Hadapsar News हडपसर, ता. 23 : हडपसर मगरपट्टा परिसरातील वेदविहार सोसायटीत निष्काळजीपणाचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, असुरक्षित आणि योग्य प्रकारे न बसवलेल्या लोखंडी घसरगुंडीमुळे ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी सोसायटीचे चेअरमन आणि कार्यकारिणी सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hadapsar News अनिका (वय 4.5) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी नवनाथ पांडुरंग देवीकर (वय 34) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ देवीकर) हे आपल्या कुटुंबासह वेदविहार सोसायटी येथे वास्तव्यास आहेत. ते आयटी कंपनीत नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 7 एप्रिल रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी अनिका (वय 4.5) शाळेतून घरी आल्यानंतर सोसायटीच्या आवारात खेळण्यासाठी गेली. Hadapsar News
यावेळी सोसायटीच्या मोकळ्या जागेत रस्त्याच्या कडेला ठेवलेली आणि व्यवस्थित फिट न केलेली लोखंडी घसरगुंडी अचानक हलली आणि थेट अनिकाच्या डोक्यावर व मानेवर कोसळली. या भीषण अपघातात अनिका गंभीर जखमी होऊन जागीच बेशुद्ध पडली. घाबरलेल्या आईने आणि स्थानिक नागरिकांनी तिला तात्काळ जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात अनिकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तब्बल आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 15 एप्रिल रोजी दुपारी 4.41 वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. Hadapsar News
दरम्यान, सोसायटीच्या हलगर्जीपणामुळे एका निरागस चिमुकलीचा जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “सुरक्षेच्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून कोण जबाबदार?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
वारंवार तक्रारी; तरीही प्रशासन गप्प!
या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे, ही लोखंडी घसरगुंडी अनेक दिवसांपासून योग्य प्रकारे बसवलेली नव्हती. सोसायटीतील रहिवाशांनी याबाबत चेअरमन व कार्यकारिणी सदस्यांना वारंवार तक्रारी करून “दुर्घटना होऊ शकते” असा इशाराही दिला होता. मात्र, सोसायटी प्रशासनाने या तक्रारींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या घटनेनंतर सोसायटीमधील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे आणखी किती निष्पाप जीवांचा बळी जाणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. Hadapsar News







