पुणे: महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर (Pune Politics) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला असून, या (Rupali Chakankar) निकालावर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी (Pune Mahapalika Election) पहिली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणूक म्हणजे हार-जीत येतच असते. पुणेकरांनी (Ajit Pawar) दिलेला कौल आम्ही स्वीकारतो. आत्मचिंतन करण्याची गरज आहे,” असं सांगत त्यांनी निकालावर संयमित आणि परिपक्व भूमिका मांडली. (Latest Marathi News)

पुण्यात अजित पवार यांनी प्रचारादरम्यान मोफत मेट्रो आणि बससेवेची घोषणा केली होती. तरीही पुणे महापालिकेत त्यांच्या पक्षाला केवळ 27 जागांवर समाधान मानावं लागलं. मागील निवडणुकीच्या तुलनेत ही कामगिरी कमकुवत ठरली आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालं नाही. या पार्श्वभूमीवर “पुणेकर सुज्ञ आहेत. लोकशाही प्रक्रियेचा सन्मान करणं महत्त्वाचं आहे. पक्ष नक्कीच या निकालाचा आढावा घेईल,” असं चाकणकर म्हणाल्या.
दरम्यान, मतमोजणीदरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवार रुपाली ठोंबरे पाटील यांनी मतमोजणी केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना चाकणकर म्हणाल्या, “आपण संविधान मानणारे लोक आहोत. काही आक्षेप असतील तर न्यायालयात दाद मागावी. गोंधळ घालणं योग्य नाही.” EVM बाबत कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं, मात्र काही ठिकाणी शाई पुसल्याच्या तक्रारी समोर आल्याचं मान्य केलं.
या निकालातून एक महत्त्वाचा धडा मिळाल्याचं चाकणकर यांनी मान्य केलं. “घड्याळ आणि तुतारी अशी दोन वेगळी चिन्हं असल्यामुळे अनेक मतदारांचा गोंधळ उडाला. एकच चिन्ह असतं तर फायदा झाला असता,” असं त्या म्हणाल्या. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये एकाच चिन्हावर लढण्याबाबत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी सूचित केलं.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा निकाल राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानला जात असून, येणाऱ्या निवडणुकांसाठी नव्याने रणनीती आखण्याची गरज पक्षासमोर उभी ठाकली आहे.







