पिंपरी-चिंचवड: 2019 ची ‘मिस इंडिया अर्थ’ विजेती आणि ग्लॅमर विश्वातील प्रसिद्ध चेहरा सायली सुर्वे हिच्या आयुष्यातील संघर्षाचा एक टप्पा अखेर संपला आहे. गेल्या 10 वर्षांपासून सहन केलेला शारीरिक आणि मानसिक छळ, जबरदस्तीने केलेले धर्मांतर आणि वैवाहिक आयुष्यातील वादळ पचवून सायलीने पुन्हा एकदा आपल्या मूळ हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने पार पडलेल्या शुद्धीकरण सोहळ्यानंतर तिचे ‘अतेझा’ हे नाव बदलून आता ‘आद्या सुर्वे’ असे नवीन नामकरण करण्यात आले आहे.

सायलीने 2014 मध्ये प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासे याच्याशी निकाह केला होता. त्यावेळी घरच्यांचा प्रखर विरोध असतानाही केवळ प्रेमाखातर तिने धर्मांतर केलं आणि ती ‘अतेझा’ झाली. मात्र, लग्नानंतर काही काळातच तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला गेला आणि तिचा छळ सुरू झाला. 10 वर्षे हा त्रास सहन केल्यानंतर आणि चार मुलांच्या भविष्याचा विचार करून तिने अखेर या नात्यातून बाहेर पडण्याचा धाडसी निर्णय घेतला.
सायलीने सांगितलं कि, “आतिफशी लग्न करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. पोलिसांकडून अपेक्षित मदत न मिळाल्याने अखेर तिने हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने ‘घरवापसी’ करण्याचा निर्णय घेतला. एका नामांकित मॉडेलला जर न्याय मिळवण्यासाठी इतकी वर्षे वाट पाहावी लागत असेल, तर सामान्य महिलांची स्थिती काय असेल, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.






