RTE Admission Process पुणे, ता. 24 : शिक्षणाचा हक्क देणाऱ्या आरटीई (Right to Education) कायद्यालाच आता भ्रष्टाचाराचा विळखा पडल्याचे धक्कादायक चित्र पुणे जिल्ह्यात समोर येत आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी खाजगी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागा या प्रत्यक्षात धनदांडग्यांनी बळकावल्याचा गंभीर आरोप होत आहे. यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. RTE Admission Process

पूर्व हवेलीसह पुणे जिल्ह्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची चर्चा जोर धरत आहे. बोगस उत्पन्नाचे दाखले, बनावट राहत्या पत्त्यांची कागदपत्रे, खोटे भाडेकरार आणि फसवे दस्तऐवज तयार करून श्रीमंत कुटुंबांनी आपल्या मुलांचे प्रवेश निश्चित केल्याचे उघड होत आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, या प्रवेशांसाठी 5 हजारांपासून ते 25 हजार रुपयांपर्यंत ‘देणघेण’ झाल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. RTE Admission Process
या संपूर्ण प्रकरणात शिक्षण विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. नियमांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून, पडताळणी प्रक्रियेत शिथिलता ठेवून आणि आर्थिक फायद्यासाठी चुकीच्या अर्जांना मंजुरी देण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे आरटीईसारख्या संवेदनशील योजनेलाच काळिमा फासला गेला आहे. हा गैरप्रकार केवळ एखाद्या शाळेपुरता किंवा भागापुरता मर्यादित नसून हवेली तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाल्याची चर्चा आहे. अनेक ठिकाणी स्थानिक गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील मुलांनी त्या जागा मिळवल्याचे वास्तव समोर येत आहे. RTE Admission Process
आरटीई ही योजना गरिबांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी राबवण्यात आली. मात्र, भ्रष्टाचारामुळे खऱ्या गरजू विद्यार्थ्यांचा हक्क हिरावला गेला असून, त्यांच्या शिक्षणाच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. पालकांमध्ये तीव्र नाराजी असून, “सरकारच्या योजना फक्त कागदावरच आहेत का?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे. या सर्व घडामोडींमुळे शिक्षण विभागाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. आता विभाग यावर नेमकी कोणती भूमिका घेणार, दोषींवर कारवाई होणार का, की हा प्रकारही दडपला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गरीब विद्यार्थ्यांचा हक्क परत मिळणार का, की भ्रष्टाचारच जिंकणार? हा सवाल सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. RTE Admission Process
आरटीई प्रवेशातील गैरप्रकार आणि घोटाळ्याची मुख्य कारणे: RTE Admission Process
गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आरटीई योजनेत घडणाऱ्या गैरप्रकारांमागे काही ठळक कारणे समोर येत असून, यामुळे संपूर्ण यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उत्पन्न दाखले, रहिवासी पुरावे आणि इतर आवश्यक कागदपत्रांची काटेकोर तपासणी केली जात नसल्याने बोगस कागदपत्रांना सहज मंजुरी मिळते. काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने पैशांच्या मोबदल्यात अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याचे आरोप होत आहेत. हीच या घोटाळ्याची प्रमुख कडी मानली जात आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असली तरी त्यातील तांत्रिक त्रुटी, डेटा पडताळणीचा अभाव आणि नियंत्रण यंत्रणेची कमतरता यामुळे गैरप्रकारांना वाव मिळत आहे. आरटीईसारखी महत्वाची योजना मूळ उद्देशापासून भरकटत असून, खऱ्या गरजू विद्यार्थ्यांचा हक्क हिरावला जात आहे. आता या सर्व कारणांवर कठोर उपाययोजना न केल्यास हा घोटाळा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. RTE Admission Process
“आरटीईसारखी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठीची महत्त्वाची योजना काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने अक्षरशः पैशांचा बाजार बनली आहे. ज्यांना खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभ मिळायला हवा होता, त्या विद्यार्थ्यांनाच वंचित ठेवून श्रीमंतांना मागच्या दाराने प्रवेश दिला जात आहे, ही अत्यंत लाजिरवाणी आणि संतापजनक बाब आहे,” ही केवळ प्रशासकीय चूक नसून मोठ्या प्रमाणावरचा संघटित घोटाळा आहे. या प्रकारात सहभागी असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा, आम्ही याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यास मागेपुढे पाहणार नाही.”“शिक्षण विभागाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पारदर्शक करावी, तसेच खऱ्या पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा,”
युवराज काकडे (सभापती, पंचायत समिती हवेली)






