पुणे : सध्या गुलेन-बॅरी सिड्रोम (जीबीएम) हा आजार आटोक्यात आला आहे. मात्र, जानेवारी महिन्यापासून जीबीएस बाधित रुग्णांची संख्या वाढत होती. दूषित पाणी आणि अन्नातून जीबीएस’चा प्रभार होत असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतचा अहवाल सार्वजनिक आरोग्य विभागाने सादर केला आहे. आजपर्यंत संकलित करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी पाण्याचे 139 आणि पोल्ट्रीचे 28 नमुने दूषित आढळून आले आहेत. यामध्ये ‘जीबीएस ‘ला कारणीभूत असणाऱ्या कॉम्पलोयंक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरस आवळून आले आहेत.
“जीबीएस’ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नमुने संकलन आणि तपासणी मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली. सिंहगड रस्ता परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पाण्याचे, अन्नाचे, मांसाचे नमुने यांसह रुग्णांच्या रक्ताचे, लघवीचे आणि शौचाचे नमुने संकलित करून तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले. तसेच, घरोघरी जाऊन सर्वेक्षणही करण्यात आले.
सध्या 24 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात जीबीएसचे 230 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 149 पुणे शहरातील, 34 पिंपरी-चिंचवडमधील, 40 पुणे ग्रामीणमधील आणि इतर जिल्ह्यांतील 15 रुणांचा समावेश आहे. जीबीएसमुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 183 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 24 रुग्ण आयसीयूमध्ये, तर 16 व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.