मुंबई : विधानसभेनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना महाराष्ट्राच्या राजकारणातील अंतर्गत लढाया चव्हाट्यावर येत आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वांद्रे परिसरात ठाकरे गटाचे आमदार आणि सचिव मिलिंद नार्वेकर
यांनी मोठ्याप्रमाणावर बॅनरबाजी केली आहे. या बॅनरबाजीमुळे भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांना थेट आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
वांद्रे पश्चिम मतदारसंघ हा आशिष शेलार यांचा बालेकिल्ला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आशिष शेलार या मतदारसंघातून निवडून येत आहेत. मिलिंद नार्वेकर यांनी पाली हिल, वांद्रे पश्चिम आणि खारदंडा परिसरात तब्बल 80 बॅनर्स लावून जोरदार हवा केली आहे.मिलिंद नार्वेकर यांनी एकप्रकारे आशिष शेलार यांना थेट आव्हान दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे यावर आता आशिष शेलार काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान दुसरीकडे खार परिसरातील एका स्मशानभूमीच्या नुतनीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे काम गेली अनेक वर्षे रखडले होते. मिलिंद नार्वेकर यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे काम केले जाणार आहे.