Ravindra Chavhan : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दारात उभ्या असतानाच महायुतीतला कलगीतुरा चांगलाच बाहेर पडायला लागलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या एका सूचक विधानं केल्याने राजकारणात खळबळच उडाली आहे. Ravindra Chavhan

शिवसेना (शिंदे गट) नेते नीलेश राणे यांनी भाजपवर सरळ पैसे वाटपाचे आरोप केले. त्याबद्दल चव्हाण यांना विचारलं असता त्यांनी फारच सांभाळून उत्तर दिलं. रविंद्र चव्हान हे जळगाव दौऱ्यावर असताना चव्हाणांना पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता तेव्हा ते म्हणाले,
“नीलेश राणेंचे आरोप खोटे आहेत. पण मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. म्हणून मी आत्ता काही बोलत नाही. २ तारखेनंतर सगळं स्पष्ट बोलेन.”
रविंद्र चव्हानांच्या या एका वाक्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून २ तारखेनंतर महायुतीत काहीतरी मोठं घडणार का? अश्या वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राणे यांनी थेट चव्हाणांवरच पैसे वाटपाचा आरोप केला आहे. त्यातच तिकीट वाटपावरून सुरू असलेल्या नाराजगी, पक्षांतरे, आणि शिंदे गटाचे काही नेते भाजपमध्ये प्रवेश घेत असल्याने एकनाथ शिंदेही नाराज असल्याची चर्चा आहे.
या सगळ्यामुळे महायुतीतील तणाव आणखी ठळकपणे समोर येत आहे. वर वरिष्ठ नेत्यांमध्ये अबोल सुरू असल्याचं चित्र दिसत असल्याने निवडणुकीनंतर युती कशी दिसेल, टिकेल का, की काहीतरी मोठं घडेल. हे सगळं २ तारखेवर येऊन थांबलं आहे. राजकारणात ऐन निवडणूक काळात असा ‘डेडलाईन’ टाईप इशारा देणं हे काही साधं प्रकरण नाही. त्यामुळे पुढची काही दिवसं रंगणार, हे मात्र नक्की!







