मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदू (Raj Thackeray) मराठी प्रचारावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी जोरदार टीका केली आहे. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातील शहरांमध्ये मराठीचा मान राखलाच पाहिजे. मुंबईचा महापौर मराठीच होणार, अशा (Devendra Fadanavis) स्पष्ट शब्दांत राज ठाकरे यांनी भूमिका मांडली. पेशव्यांच्या काळात मराठेशाहीने बडोदा साम्राज्य उभं केलं, तेव्हा तिथले सगळे महापौर गुजरातीच होते का, असा सवाल करत त्यांनी महाराष्ट्रात मराठी नेतृत्वच असायला हवं, असं ठामपणे सांगितलं. (Latest Marathi News)

वचननाम्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आम्ही विकासाच्या योजना राबवू इच्छितो, मात्र त्यासाठी राज्य किंवा केंद्राची परवानगी लागते आणि ती दिली जात नाही. अशावेळी विकासकामे अडवून तरी दाखवा, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनीही पत्रकारांच्या प्रश्नावर राज ठाकरे उत्तर देत असताना हस्तक्षेप करत, यांना विकासकामे अडवू द्या, यांचं ढोंग तरी समोर येऊ द्या, अशी टिप्पणी केली.
सत्तेबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. सध्या सत्तेत असलेल्यांना आपण कायम सत्तेत राहू, असा भ्रम झाला असेल तर तो लवकरच दूर होईल. काँग्रेसने पूर्वी जे केलं तेच आम्ही करतोय, अशी कारणे देणे धोकादायक असल्याचेही त्यांनी सांगितले. आज जे चुकीचे पायंडे पाडले जात आहेत, ते उद्या दामदुपटीने पुढे वापरले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.
राज ठाकरे यांनी बिनविरोध निवडणुकांवरही टीका केली. पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारांविरोधात भाजप सुप्रीम कोर्टात गेला होता, मग महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांबाबत भाजपची भूमिका काय आहे, यावर स्पष्ट बोलावे, अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्राला युपी-बिहारसारखं करण्याचा प्रयत्न सुरू असून, देशाला दिशा देणाऱ्या सुसंस्कृत महाराष्ट्राचं वाटोळं होऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.







