मुंबई: राज्यातील 29 महापालिकांच्या (Nitesh Rane) निवडणुकांचे अंतिम कल हळूहळू स्पष्ट होत असताना भाजप पुन्हा एकदा राज्यातील सर्वात मोठा पक्ष (Mumbai BMC Election Result) ठरत असल्याचं चित्र समोर येत आहे. अनेक महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीने (Uddhav Thackeray) आघाडी घेतली असून, विशेषतः देशाचं आर्थिक केंद्र (Raj Thackeray) मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. त्या मुंबईत ठाकरे बंधूंना मोठा धक्का देत भाजपने निर्णायक आघाडी घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मुंबई (Maharashtra Politics) महापालिकेत भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीचा महापौर बसण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. (Latest Marathi News)

मुंबई महापालिका ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही, तर ती राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी सत्ता मानली जाते. तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत भाजपला रोखण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मतदारांनी या युतीला नाकारत भाजप आणि महायुतीवर पुन्हा एकदा विश्वास टाकल्याचं या निकालातून दिसून येत आहे. मुंबईतील सत्ता हातातून गेल्यामुळे ठाकरे बंधूंना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
दरम्यान, निकालानंतर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे बंधूंवर निशाणा साधताना नितेश राणे यांनी खोचक आणि वादग्रस्त टोला लगावला. “माझा हसणारा चेहरा उद्धव ठाकरेला पाठवा. सगळ्यांना माझा जय श्रीराम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आणि महायुतीच्या नेतृत्वात जय श्रीराम वाला महापौर बसणार आहे,” असं म्हणत त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.
याचवेळी त्यांनी ठाकरे बंधूंना उद्देशून केलेलं वक्तव्य मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे. “दोन्ही ठाकरे बंधूंनी संध्याकाळची इस्लामाबादची विमान पकडावी आणि पाकिस्तानमध्ये जावं, अल्लाहो अकबर म्हणत राहावं,” असा टोला त्यांनी लगावला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
एकीकडे भाजप आणि महायुतीसाठी हा ऐतिहासिक विजय मानला जात असताना, दुसरीकडे ठाकरे गटासाठी हा पराभव आत्मपरीक्षणाची वेळ ठरणार आहे. मुंबईची सत्ता कोणाच्या हाती जाणार, नवा महापौर कोण असेल आणि पुढील पाच वर्षांत मुंबईचा कारभार कसा चालेल, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.







