काजू, बदाम, मनुके आणि आक्रोड यांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश करावा, असे म्हटले जाते. हे घटक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात. पण, अनेकांना प्रश्न असा पडतो की, बदाम-अक्रोड खाताना कच्चे खावे की भिजवलेले हे माहिती नसते. मात्र, याची माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.

अनेकांना असे वाटते की, भिजवलेल्या सुक्या मेव्याचे पचन लवकर आणि सहज होते. पण याला मिथक म्हटले आहे. भिजल्याने पचनक्रिया वेगवान होते याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बदाम आणि अक्रोडसारखी सुके पदार्थ भिजवून घ्यावीत की कच्चे खावीत ही पूर्णपणे तुमच्या वैयक्तिक निवडीवर आधारित आहे. पण कच्चे-सुके फळ खाणे हानिकारक आहे किंवा कमी पोषण मिळेल असा विचार करणे चुकीचे आहे.

तुमच्यापैकी अनेकांनी बदाम, अक्रोड किंवा इतर ड्रायफ्रूट्स खाल्ले असतील. काही लोक ते कच्चे खातात तर काहीजण रात्रभर भिजवून घेतात. बदाम आणि अक्रोड पाण्यात भिजवल्याने फायटिक ॲसिड कमी होते. जे त्यातील पोषक तत्वांचा वापर करण्यापासून रोखते. बदाम 24 तास भिजत ठेवले तरी केवळ 5 टक्के फायटिक ॲसिड कमी होते. त्यामुळे जसे योग्य वाटते तशाच प्रकारे आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.








