अलिगड : अलीगडमध्ये जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीचा संसार सुरु होण्याआधीच मोडला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.लेकीचं लग्न ज्या पुरुषासोबत होणार होतं, त्याच्यासोबतच आई पळून गेली असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्या दोघांमध्येहीलव्ह कनेक्शन होत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अलिगड जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूर गावातील आहे. याप्रकरणी जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार 16 एप्रिल रोजी त्यांच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाची मोठ्या उत्साहात तयारी सुरु होती. नातेवाईकांना पत्रिका देखील पाठवण्यात आल्या होत्या.. पण अचानक पत्नी घरातून गायब झाली. पत्नी नातेवाईकांकडे पत्रिका देण्यासाठी गेली असावी असं जितेंद्र यांना वाटलं. पण असं काहीही नव्हतं.अनेक ठिकाणी विचारपूसं केल्यानंतर, मोबाईलची माहिती मिळवल्यानंतर एक धक्कादायक सत्य समोर आलं कि, पत्नी मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत लग्नापूर्वी घरातून पळून गेली आहे. दोघांनी जवळपास सुमारे 3.5 लाख रुपये रोख आणि सुमारे 5 लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिनेही पळवून नेले आहेत. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पत्नी आणि होणाऱ्या जावयाच्या लव्ह कनेक्शनचे माध्यम होत स्मार्टफोन…जो मुलीच्या आईला जावयाने भेट म्हणून दिलेला. दोघे एकमेकांसोबत 20 तासांपेक्षा अधिक वेळ गप्पा करत असायचे.नवरा मुलगा दिवसातील 24 तासांमध्ये 20 – 22 तास सासूसोबत बोलतोय. माझ्या मुलीसोबत फार कमी बोलत आहे, तेव्हा संपूर्ण प्रकरण माझ्या लक्षात आलं असं मुलीचे वडील जितेंद्र यांनी सांगितले. या प्रकरणानंतर धक्का बसलेली मुलगी शिवानी हिने माझ्याच आईने माझं आयुष्या उद्ध्वस्तत केलं आहे.. आता माझ्या आयुष्यात तिचं काहीही महत्त्व नाही. आम्हाला फक्त आमचं सामान हवं आहे असं म्हटलं आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून त्यात फसवणूक, विश्वासघात झाला आहे. दरम्यान त्या महिलेचा आणि तरुणाचा मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर शोध सुरु आहे.