पुणे : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी अवादा कंपनी महत्त्वाची ठरली आहे.कारण याच ठिकाणाहून भांडणाची सुरुवात झाली होती. या संपूर्ण घटनेत तीन वॉचमेनचे जबाब महत्त्वाचे ठरले होते. सुदर्शन घुले यांने सरपंच संतोष देशमुख यांना धमकी दिल्याचं वॉचमनच्या जबाबातून समोर आल आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अवादा कंपनीपासूनच या संपूर्ण घटनाक्रमाला सुरुवात झाली. त्यामुळे हत्या प्रकरणाच्या तपासात तीन वॉचमनचे जबाब महत्त्वाचे ठरले आहेत.कंपनी बंद करु नका, लोकांना रोजगार मिळू द्यात असं सरपंच देशमुख सुदर्शन घुलेना सांगत होते., मात्र सुदर्शन घुले यांने देशमुखांना धमकी दिली. याप्रकरणी तिन्ही वॉचमेन हे प्रत्यक्षदर्शी आहेत. सरपंच देशमुख यांना मारहाण होताना त्यांनी पाहिलं होतं. त्यांच्या या जबाबात संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
आवादा एनर्जी प्रकल्पावर तीन वॉचमन कामावर होते. त्यावेळी सुदर्शन घुले त्याच्या साथीदारासह अवादा एनर्जी प्रकल्पावर आला. यावेळी सुदर्शन घुलेने वॉचमनला मारहाण केली. त्यानंतर प्रकल्पाचे मॅनेजर शिवाजी थोपटे यांच्याकडे वॉचमन समोर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली.. ही खंडणी नाही दिली तर कंपनी बंद करायची धमकीही दिली होती. हे भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख या ठिकाणी पोहोचले होते.कंपनी बंद करू नका,लोकांना रोजगार मिळू द्या असे सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना सरपंच देशमुख म्हणत होते. त्यावेळी सुदर्शन घुलेने सरपंच देशमुख यांना सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही.’अशी धमकी दिली असा जबाब वॉचमनने दिला आहे.