Rahul Gandhi : नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन संकट गडद होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर संयमाने करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या आवाहनावर टीका करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. Rahul Gandhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच नागरिकांना काही गोष्टींमध्ये काटकसर करण्याचा सल्ला दिला होता. यामध्ये पेट्रोलचा वापर कमी करणे, सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करणे, मेट्रोने प्रवास करणे, ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य देणे तसेच अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. Rahul Gandhi

यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “देशाला अशा परिस्थितीत आणले गेले आहे की आता नागरिकांना काय खरेदी करावे आणि कसे जगावे हे सांगावे लागत आहे. प्रत्येक वेळी जबाबदारी जनतेवर टाकून सरकार स्वतःची जबाबदारी झटकत आहे.” Rahul Gandhi
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक आणि ऊर्जा धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “देश चालवणे ही गंभीर जबाबदारी आहे,” असेही नमूद केले. दरम्यान, राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, भाजपकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Rahul Gandhi







