Mumbai News मुंबई, ता. 29 : दक्षिण मुंबईतील पायधूनी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांचा कलिंगड खाल्ल्यानंतर संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणात मृतांच्या शरीरात “वेदनाशामकासारखा” पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. Mumbai News

पोस्टमॉर्टेमदरम्यान हा संशय व्यक्त केला जात असताना, पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. संबंधित कुटुंबाने ज्या विक्रेत्याकडून कलिंगड खरेदी केले होते, त्या दुकानदाराचीही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. Mumbai News
दुकानदाराच्या वडिलांनी मात्र आरोप फेटाळून लावत स्पष्ट केले की, “आमच्या कलिंगडमध्ये कोणताही दोष नव्हता. अनेक वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय करतो, आजवर एकही तक्रार आली नाही. तरीही आमचे दुकान बंद करण्यास भाग पाडले गेले. चौकशी करायची असेल तर जरूर करा, आम्ही सहकार्य करू.” संबंधित दुकान नळ बाजार परिसरात असून, घटनेनंतर ते बंद ठेवण्यात आले आहे.
नेमकी घटना 25 एप्रिल रोजी रात्रीची आहे. डोकाडिया कुटुंबीयांनी कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच उलट्या, चक्कर आणि पोटदुखीची लक्षणे जाणवू लागली. दुसऱ्या दिवशी प्रकृती अधिकच खालावल्याने चौघांनाही जेजे रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोन्ही मुलींचा आणि त्यानंतर पालकांचाही मृत्यू झाला. Mumbai News
दरम्यान, या हृदयद्रावक घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, मृत्यूमागील नेमके कारण काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिस आणि आरोग्य विभाग सखोल तपास करत असून, अहवालानंतरच सत्य स्पष्ट होणार आहे. Mumbai News







