पुणे : महाराष्ट्र शासनाने जून 2026 मध्ये घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ या ऐतिहासिक निर्णयाला मंजुरी दिली आहे.ज्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.या कर्जमाफीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.महायुती सरकार हे नेहमीच अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे आणि राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचाच आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले,सरकारने या योजनेतील पूर्वीची 50 हजारांची जाचक अट शिथिल केली आहे. या महत्त्वपूर्ण बदलामुळे आता लाखो शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ होणार असून, त्यांना अडचणीच्या काळात एक मोठा पाठबळ मिळाले आहे.
महायुती सरकार हे नेहमीच अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना सुमारे 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. ही सवलत प्रामुख्याने अल्पमुदतीच्या पीक कर्जासाठी लागू असेल, ज्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

या कल्याणकारी निर्णयाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही जाहीर कौतुक केले आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुरुवातीला या योजनेत असलेल्या काही जाचक अटी सरकारने मागे घेतल्याबद्दल पवारांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले. हा निर्णय पूर्णपणे शेतकरी हिताचा असून त्यांच्या भावनांचा आदर करणारा आहे, असेही ते म्हणाले.
शरद पवारांच्या या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे महायुती सरकारमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “पवार साहेब हे अत्यंत ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. चांगल्या कामाला चांगले म्हणण्याची त्यांची वृत्ती आहे.” विरोधकांवर निशाणा साधत ते पुढे म्हणाले की, विरोधी पक्षातील काही लोक ‘खोटं बोला पण रेटून बोला’ या मानसिकतेने सरकारवर टीका करत असतात, परंतु पवारांच्या कौतुकाने अशा टीकाकारांना चोख उत्तर मिळाले आहे.







