Ambarnath Accident: ठाण्यातीलअंबरनाथ शहरातील उड्डाणपुलावर दि.21 नोव्हेंबर (शुक्रवारी) संध्याकाळी भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Ambernath Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कारचे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने समोरून येणाऱ्या दोन ते तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कार उलटली. या भीषण कार अपघातात चालक, तसेच दुचाकींवरील तीन जणांचा मृत्यू झाला.
हेही वाचा- सोन्याचे दर सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; चांदीचे भावही गडगडले ! पाहा आजचे भाव काय?
हा अपघात नेमका कसा झाला?
कार चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. प्रवासादरम्यान ह्रदयविकाराचा झटका आल्याने भरधाव कार अनियंत्रित झाली आणि समोरून येणाऱ्या गाड्यांना धडक दिली. या कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार किरण चौबे होत्या. त्या आगामी निवडणूक प्रचारासाठी बुवापाडा भागात कारने जात होत्या.
या अपघातात लक्ष्मण शिंदे, चंद्रकांत अनारसे (नगर परिषद कर्मचारी), सुमित चेलानी आणि शैलेश जाधव यांचा मृत्यू झाला. विशेषतः चंद्रकांत अनारसे मोटारसायकलवरून जात असताना पुलावरून खाली पडले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
जखमींमध्ये शिवसेना उमेदवार किरण चौबे, अमित चौहान आणि अभिषेक चौहान यांचा समावेश असून चौबे यांच्यावर अंबरनाथमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिकांनी तत्परता दाखवत कारची काच फोडून चौबे यांना बाहेर काढले.
दरम्यान, अंबरनाथ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अपघाताचा नेमका क्रम निश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासले जात आहेत.






