पुणे : अभिनेता आमिर खानने काही वर्षांपूर्वी पाणी फाउंडेशनची स्थापना केली होती.सत्यमेव जयतेच्या वैशिष्ट्याप्रमाणे महाराष्ट्रातील विशेषत: दुष्काळी असणाऱ्या मराठवाड्यातील काही गावांमध्ये पानी फाऊंडेशनचे काम झाले. आता महाराष्ट्रभर पाणी फाऊंडेशन काम करणार असल्याची घोषणा आमिर खानने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यभरातील अनेक गावांमध्ये पाणी फाऊंडेशनचं तुफान पुन्हा येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या उपक्रमाचा शुभारंभ पुण्यात करण्यात आला. तीन वर्षांपूर्वी एक स्वप्न शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो. त्यानुसार शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो, पीक कसे वाढवता येईल हे सगळे मुद्दे घेऊन समोर आलो होता. देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो की ते आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले म्हणून दरवर्षी आम्ही यशस्वी होत गेलो. असेही आमिर खान यांनी म्हटले.
पुढे बोलताना आमिर खान यांनी असे म्हटले, आम्ही आता पाणी फाउंडेशनचे काम राज्यभर करणार आहोत.पुढच्या वर्षीपासून आम्ही पूर्ण महाराष्ट्रात हे काम करू. संपूर्ण महाराष्ट्रात पाणी फाउंडेशन सुरू करण्याची जिम्मेदारी खूप मोठी आहे. मात्र आता सत्यमेव जयते मार्फत दुष्काळाचं आव्हान पेलण्याचे ठरवले असून संपूर्ण महाराष्ट्रभर पाणी फाउंडेशनचे काम सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.