Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्र ‘शेतीमाल मंत्रालय’ स्थापन करावे: आमदार ॲड. राहुल कुल यांची आग्रही मागणी

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Friday, 10 July 2026, 15:12

पुणे : राज्याची आणि देशाची अर्थव्यवस्था आजही मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे. मात्र, बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आणि त्याच्या शेतीमालाला हक्काचे संरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी शासनाने शेतीमालाच्या दरांवर शेतकऱ्यांचे थेट नियंत्रण राहील अशी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी आणि ‘शेतीमाल मंत्रालय’ सुरू करावे, अशी आग्रही मागणी दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी विधानसभेत केली.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान नियम २९३ अन्वये आयोजित चर्चेत आमदार ॲड. राहुल कुल बोलत होते.
यावेळी आमदार ॲड. राहुल कुल म्हणाले की, “आज देशाची लोकसंख्या १४५ कोटींच्या पुढे गेली आहे, तर जगाची लोकसंख्या ८०० कोटींवर पोहोचली आहे. २०५० पर्यंत ती ९७० कोटींवर जाईल, असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत अन्न सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असताना, अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याला बाजारपेठेचे आणि दरांचे संरक्षण मिळणे आवश्यक आहे.”

कांदा, ऊस किंवा इतर कोणत्याही शेतीमालाचे दर एका रात्रीत वाढत किंवा कमी होत नाहीत. तसेच कोणत्याही पिकाचे उत्पादन एका रात्रीत अतिरिक्त होत नाही किंवा त्याचा तुटवडाही भासत नाही. या सर्व परिस्थितीची पूर्वकल्पना शासन स्तरावर असू शकते. मात्र, विविध विभागांमध्ये योग्य समन्वय नसल्यामुळे कोणत्या पिकाची कधी आयात करायची आणि कधी निर्यात करायची, याबाबत ठोस निर्णय घेता येत नाही. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो.

कांद्याचे दर कोसळले की शेतकरी अडचणीत येतो आणि दर वाढले की ग्राहकांना महाग मिळतो. ही अनिश्चितता संपवण्यासाठी शासकीय स्तरावर एक मजबूत समन्वय यंत्रणा उभी राहिली पाहिजे, असे कुल यांनी नमूद केले.

 

साखरेचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणावे तसे वाढत नसले, तरी उसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या असणाऱ्या अपेक्षा पूर्णपणे योग्य आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे आर्थिक मॅकेनिझम शासनाने तयार केले पाहिजे, जेणेकरून साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी दोघांनाही दिलासा मिळेल, असेही कुल यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा, बाजारात त्यांचे शोषण थांबावे आणि शेती क्षेत्राला स्थैर्य लाभावे, यासाठी शासनाने आपल्याओ मागण्यांची सकारात्मक नोंद घ्यावी, अशी अपेक्षा आमदार राहुल कुल यांनी शेवटी व्यक्त केली.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

जनावरांसाठी बांधलेल्या दवाखान्यात माणसांवर उपचार; 24 गावांतील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Saturday, 12 September 2026, 12:16

Baramati News: मैत्रिणीकडे जाण्याच्या बहाण्याने घर सोडलं, पुढे घडलं धक्कादायक! पोलिसांच्या समुपदेशनानंतर सत्य आलं समोर

Saturday, 12 September 2026, 11:53

पुण्यात वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; 10 लाखांच्या 14 दुचाकी जप्त! पिंपरी-चिंचवडसह इतर जिल्ह्यांतील 12 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस

Saturday, 12 September 2026, 11:49

कल्याणीनगरमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! तीन महिलांची सुटका, रिक्षाचालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Saturday, 12 September 2026, 11:45

आकाश पाळण्यात बसली अन् काही क्षणात तिच्या डोक्याची चामडी निघाली; यात्रेत महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Saturday, 12 September 2026, 11:12

फक्त 600 रुपयांसाठी मित्राचा जीव घेतला! उसने दिलेले पैसे मागितले अन् त्याने चाकूने सपासप वार करून संपवले; पुण्यात खळबळ

Saturday, 12 September 2026, 10:41
Next Post

वारकऱ्यांची आर्थिक लूट? मोफत शौचालयासाठीही मोजावे लागतायत पैसे; पुणे मनपावर गंभीर प्रश्नचिन्ह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp