पुणे : तीव्र उन्हाळ्यात सामान्य समस्यांपैकी एक म्हणजे ३५ ते ५० वयोगटातील प्रौढांमध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गात (यूटीआय) वाढ होते. अति उष्णता, निर्जलीकरण आणि तापमानात होणारा चढउतार हे या संसर्गात वाढ होण्यास कारणीभूत ठरतात. वेळीच निदान आणि उपचार केल्याने संसर्ग रोखणे शक्य होते, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले.
शरीर हायड्रेटेड राखणे, सुती अंतर्वस्त्रांचा वापर करणे आणि जास्त काळ लघवी रोखून न धरणे, यामुळे देखील मूत्रमार्गाचा संसर्गाची शक्यता कमी होऊ शकते. लघवी करताना जळजळ होणे, लघवीमध्ये फेस किंवा दुर्गंधीयुक्त लघवी, वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे, लघवीत रक्त येणे, ताप येणे आणि ओटीपोटात वेदना होणे ही याची लक्षणे आहेत. जर वेळेवर उपचार केले नाहीत, तर त्यामुळे किडनी संसर्ग होऊ शकतो.
याबाबत अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील युरोलॉजिस्ट डॉ. पवन रहांगडाले म्हणाले की, उन्हाळ्यात जेव्हा शरीरात पुरेसे द्रवपदार्थ नसतात. तेव्हा मूत्राशयातून विषारी पदार्थ आणि बॅक्टेरिया बाहेर काढता येत नाही, ज्यामुळे संसर्ग होतो. मदरहुडच्या प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पद्मा श्रीवास्तव म्हणाले की, दर आठवड्याला मूत्रमार्गाच्या संसर्गाचे १० रुग्ण आढळतात. नाजूक भागामध्ये रासायनिक उत्पादनांचा तसेच आणि परफ्यूमचा वापर टाळणे योग्य राहिल.