मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील एक अतिशय लाडकी आणि लोकप्रिय जोडी म्हणून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर-कोठारे यांच्याकडे पाहिले जायचे. मात्र, आता या जोडीच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम देत, आदिनाथ आणि उर्मिला यांनी अधिकृतपणे वेगळे होत असल्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट प्रसिद्ध करत त्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याचा प्रवास थांबवल्याचे जाहीर केले.

2011 मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीची पहिली भेट ‘शुभमंगल सावधान’ या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. तब्बल 15 ते 16 वर्षांच्या दीर्घ संसारानंतर या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याने मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

आपल्या पोस्टमध्ये या दोघांनी स्पष्ट केले आहे की, हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि परस्परांच्या पूर्ण संमतीने घेण्यात आला आहे. पती-पत्नी म्हणून वेगळे होत असलो तरी, त्यांची मुलगी ‘जिजा’ ही त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू राहणार आहे. जिजाच्या संगोपनाची जबाबदारी दोघेही मिळून आणि आनंदाने पार पाडणार आहेत.







