नवी दिल्ली : मार्चमध्ये भारतातील घाऊक महागाई दर 2.05 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. गेल्या चार महिन्यांतील हा सर्वात कमी दर आहे. जानेवारीमध्ये हा दर 2.38 टक्के होता. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, घाऊक महागाई 2.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. घाऊक महागाई दर म्हणजे कारखान्यांपासून दुकानांमध्ये येणाऱ्या वस्तूंच्या किमतींमध्ये बदल आहे. हा दर कमी झाला आहे.
मार्च 2025 मध्ये महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे अन्नपदार्थ, इतर उत्पादने, वीज आणि कपड्यांच्या किमतीत झालेली वाढ हे आहे. गेल्या महिन्यात घाऊक अन्न महागाईत 4.66 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. फेब्रुवारीमध्ये ते 5.94 टक्के होते. म्हणजेच अन्नपदार्थांच्या, खाण्या-पिण्याच्या किमती आता कमी दरात वाढत आहेत. त्यातच देशभरात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. यामुळे वाढत्या महागाईची चिंता वाढली आहे. कारण, जसजसे हवामान खराब होईल आणि उष्णता वाढेल तसतसे भाज्या आणि फळांचे भाव वाढू लागतील. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे.
मार्चमध्ये प्राथमिक वस्तूंचा महागाई दर 0.76 टक्क्यांपर्यंत घसरला. फेब्रुवारीमध्ये हा दर 2.81 टक्क्यांवर होता. शेतातून किंवा खाणींमधून थेट मिळतात, ज्यात धान्य, फळे, भाज्या यांचा समावेश प्राथमिक वस्तूंमध्ये होतो. आता यामध्येही घसरण झाल्याचे दिसून आले.